स्वच्छ भारत अभियान ( वैयक्तिक शौचालय बांधकाम ) कालावधी : मागणी नुसार लाभ देणेत येतो


योजनेचा लक्षांक ( उद्दिष्ट ) :- ३३८ ( सन २०२५-२६ करीता )


लाभाचे स्वरूप :- लाभार्थ्याने वैयक्तिक शौचालय बांधकाम पडताळणी नंतर PFMS प्रणाली च्या माध्यमातून आधार सलग्न खाते वरती तालुका स्तरावरून निधी वितरीत करणेत येतो .

पात्रता व अटी :-

१) लाभार्थी BPL एस.सी./एस.टी किवां अल्पभूधारक ,भूमिहीन शेतमजूर,महिला कुटुंब प्रमूख ,अपंग कुटुंब प्रमूख या घटका पैकी शौचालय नसलेले लाभार्थी योजनेचा लाभ घेउ शकतात .


२) लाभार्थी किवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने या पूर्वी कोणत्याही योजनेतून शौचालय बांधकामाचा लाभ घेतला नसावा. अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

शासन निर्णय : पहा






सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कालावधी :  


मार्गदर्शक सूचना : - महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग


शासन निर्णय क्रमांक :- स्वभाभम२०21/प्र.क्र.272 /पापु- १६, मंत्रालय, मंबुई ४०० ०३२. दिनांक ०२ डिसेंबर २०२१ .
पाणी व स्वच्छता विभाग,शासन निर्णय क्र.संस्वअ २०१० /प्र.क्र.२४३/पापु १६,दिनांक ०३ जानेवारी,२०११ व
क्र.स्वभमि ०१२ /प्र.क्र. २७३/पापु,१६,दिनांक २१ ऑगस्ट,२०१३ हे दोन शासन निर्णय अधिक्रमित करून,राज्यातील ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबबत,मार्गदर्शक सुचनाशासन निर्णय क्रमांक स्वभामि२०१९/प्र.क्र.१४१/पापु १६ तसेच शासन परिपत्रक क्रमांक स्वभामि२०२०/प्र.क्र ११६/पापु १६ मध्ये निर्गमीत केलेल्या आहेत.केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ (ग्रामीण)संदर्भांधीन नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या घटकाचा समावेश केला आहे.

विषयाधीन घटकासाठी ,लोकसंख्या आधारित अर्थसहाय्य अनुज्ञेय असून,यासाठी केंद्र व राज्याचा अर्थसह्याचा हिस्सा ६०:४० या प्रमाणात आहे.यामध्ये लाभार्थी ग्रामपंचायतीचा हिस्सा नीरंक आहे.


केंद्र शासनाने माहे जुलै,२०२० च्या मार्गदर्शक सूचनान्वये,या टप्प्यात घ्यावयाच्या काही कामाकरीता १५ वा वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतीना मिळणारा निधी,नरेगा वा इतर निधी स्रोताच्या कृतीसंगमातून घ्यावयाचा आहे.

तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प नियोजन यासाठी व्यावसायिक संस्था/स्वयंसेवी संस्था यांचा समावेश सर्वेक्षण करणे,अंदाजपत्रकीय प्रस्ताव तयार करणे,आराखडे तयार करणे व तांत्रिक सल्ला/सहाय्य प्रदान करणे यासाठी करणे सुचविले आहे.


संपूर्ण स्वच्छता अभियानात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे महत्व स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.अभियानाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे की,पूर्वी स्वच्छतेची संकल्पना मानवी विष्ठेच्या विविध पद्धतीने करावयाच्या विल्हेवाटीपुरती मर्यादित होती.


तथापि,आता या संदर्भात व्यापक संकल्पनेचा स्वीकार केला गेला आहे.ज्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन,सुरक्षित अन्न,वैयक्तिक व घरगुती आणि पर्यावरणीय स्वच्छता या घटकांचा समावेश आहे.


स्वच्छता हि केवळ सामान्य आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची नसून वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातही तिचे अनन्य साधारण महत्व आहे.


जीवनमानाचा दर्जा आणि मानवी विकास निर्देशांक ठरविण्याच्या मुलभूत घटकात स्वच्छतेचा समावेश होतो.


स्वच्छता विषयक योग्य सवयीच्या माध्यमातून पाणी आणि मातीचे प्रदूषण टाळता येते.


स्वच्छता विषयक योग्य सवयीच्या माध्यमातून पाणी आणि मातीचे प्रदूषण टाळता येते.ज्याद्वारे रोगांना प्रतिबंध करता येतो.या पाश्वर्भूमीवर वैयक्तिक स्वच्छता,घरगुती स्वच्छता,स्वच्छ व सुरक्षित पाणी,घनकचरा व्यवस्थापन,सांडपाणी व्यवस्थापन आणि मानवी विष्टेचे व्यवस्थापन या सर्व घटकांचा समावेश करून स्वच्छता संकल्पनेची व्याप्ती वाढविण्यात आले आहे.


नमूद स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)-टप्पा-२ मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे- गावाची लोकसंख्या घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन ५००० पेक्षाकमी रु.६०प्रती माणसी रु.२८०माणसी ५००० पेक्षा जास्त रु.४५माणसी रु. ६६०माणसी सांडपाणी व घनकचऱ्याचे संकलन,परिवहन आणि सुरक्षित व योग्य विल्हेवाट म्हणजेच सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन,मानवी जीवनामध्ये दैनदिन निर्माण होणाऱ्या सांडपाणी व घनकचऱ्याचा आरोग्य व पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून शास्त्रोक्त योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. याकरिता कचरा व सांडपाणी याकडे एक साधन संपत्ती या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. या साठी खालील महत्वाचे मुद्दे समजून घेणे उपयुक्त आहे.


अ)कमी वापर (Reduce)- Reduce/Minimisation म्हणजेच दैनदिन वस्तूचा कमीत कमी वापर करणे.उदा.प्लास्टिक,प्लास्टिक हि अविघटनशील वस्तू आहे.प्लास्टिक वापराची सध्याची व्याप्ती लक्षात घेता,त्याचे पुन्रचक्रीकरण करण्याचे,उपलब्ध असलेले तांत्रिक व आर्थिक उपाय किफायतशीर नाहीत.अशा वस्तूचा किमान वापर करणे, त्यापासून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण कमी करणे व अशा वस्तू वापराबाबत,ग्रामस्थांच्या वर्तुणुकीमध्ये बदल गरजेचे आहे.


ब) पुनर्वापर(Reduce)- पुनर्वापर होण्यासारख्या वस्तूचा वापर करून,घनकचऱ्याची निर्मिती किमान होईल,याची दक्षता घ्यावी.त्यामुळे नवीन वस्तूंची मागणी कमी होईल व पर्यायाने कचरा कमी होईल.


क) पुनर्चक्रीक्ररण (Recycle) कोणत्याही निरुपयोगी वस्तूचे भौतिक अथवा रासायनिक पद्धतीने विघटन करून,त्यावर प्रक्रिया करणे व नवीन वस्तूची निर्मिती करणे म्हणजे पुन्रचक्रीकरण(Recycleling), पुन्रचक्रीकरण यामध्ये दोन पद्धती येतात सायकलिंग अपसायकलिंग म्हणजे,जुन्या वस्तूचे त्याच्या पूर्वीच्या मूल्यापेक्षा अधिक मूल्याची वस्तू निर्माण करणे.डाऊन सायकलिंग म्हणजे,जुन्या वस्तूचे त्याच्या पूर्वीच्या मूल्यापेक्षा कमी मूल्याची वस्तू निर्माण करणे.


ड) पूनर्प्राप्ती (Recovery)- पूनर्प्राप्ती म्हणजे निरुपयोगी कचऱ्यापासून उर्जा निर्मिती करणे. जसे विघटनशील (Degradable) कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती व निरुपयोगी प्लास्टिक पासून इंधन निर्मिती करणे होय.याकरिता जमा केलेला निरुपयोगी प्लास्टिक कचरा PRO (producer responsibility organization)/जिल्हा अथवा तालुका स्तरीय प्लास्टिक वेस्ट मँनेजमेंट युनिट कडे शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे देणे आवश्यक आहे.


१)भौतिक घटकांनुसार कचऱ्याचे वर्गीकरण प्रमाणे केले जाते – घनकचरा घरात,व्यवसायात,उद्योगात निर्माण होणाऱ्या सेंद्रिय आणि असेंद्रिय वस्तू ज्याची शून्य किंमत असून त्याने या वस्तूंना कचरा असे संबोधले आहे.मानवी विष्ठा,मुत्र आणि सांडपाणी वगळून सर्व उर्वरित कचऱ्यास घनकचरा असे म्हणतात. जैव विघटनशीलतेच्या आधारे आणि अंतिम विल्हेवाटीच्या पद्धतीनुसार घनकचऱ्याचे वर्गीकरण जैव विघटनशील असा कचरा जो जीवशात्रीय प्रक्रियेद्वारे पूर्णपणे विघटीत होऊ शकतो.त्यासाठी हवा उपलब्ध असली किंवा नसली तरी चालू शकते.स्वयंपाक घरातील कचरा,जनावरांचे शेण,शेतातील कचरा इ. अजैव विघटनशील जीवशात्रीय प्रक्रियेद्वारे ज्या कचऱ्याचे विघटन होऊ शकत नाही असा कचरा.या कचऱ्याचे पुनर्वापरयोग्य व अयोग्य असे दोन प्रकार आहेत. पुनर्वापर योग्य असा कचरा ज्याला आर्थिक मूल्य आहे पण ज्याची विल्हेवाट लावायची आहे आणि जो त्याच्यामधील उर्जामुल्याच्या सहाय्याने उदा.प्लास्टिक,कागद,कपडा इ. पुनर्वापरास अयोग्य असा कचरा ज्याला आर्थिक मूल्य नाही आणि ज्यातून काहीच निघत नाही.उदा.कार्बन,थर्माकोल,टेट्रापँक इ.


२) ग्रामीण भागात आढळणारा जैव विघटनशील व अजैवीक कचरा जैव विघटनशील कचरा अजैवीक विघटनशील कचरा
▪ भाज्या आणि फळाचा उरलेला भाग,केळीची पाने,नारळाच्या करवंटया,अंड्याचीटरफले,वाळलेली फुले,फांद्या इ.
▪ मांसाहारी कचरा (प्राण्यांची हाडे,कोंबडीचे पंख इ.)
▪ स्वयंपाक घरातील कचरा
▪ राख आणि कोळसा
▪ चहा,कॉफी पावडर
▪ झाडलोटीचा कचरा
▪ अन्नधान्य स्वच्छ करताना निर्माण होणारा कचरा इ.
▪ कागद : वह्या ,पुस्तके,वर्तमान पत्रे,पुठठे
▪ प्लास्टिक : केरीबँग,वस्तूची खोकी,दुधाच्या पिशव्या,तुटलेली प्लास्टिक भांडी,पाण्याच्या बाटल्या,रिकाम्या टूथपेस्ट इ.
▪ धातू : निकामी लोखंड,तांबे आणि स्टील
▪ औषधी गोळ्याची वेस्टणे,अन्नपदार्थासाठी वापरली जाणारी अल्युमिनियमची वेष्टणे
▪ काच : बाटल्या आणि काचेचे तुकडे
▪ लाकूड ,कपडा
▪ चमडा : तुटलेला चपला आणि बँग्स
▪ रबर :स्लीपर्स
▪ विद्युत वायर,खराब झालेल्या बँटऱ्या व बल्ब आणि इलेक्ट्रॉनिक कचरा इ.


३) सांडपाणीवर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते सांडपाणी वापरलेल्या आणि आवश्यकता नसलेल्या पाण्याला सांडपाणी असे म्हणतात.रंग,उगमस्थान आणि विषाणूंचे प्रमाण या आधारे सांडपाण्याचे दुषित आणि सांडपाणी असे दोन प्रकार पडतात. दुषित पाणी (black water)स्वच्छता घर,शौचालय येणारे पाणी.अशा पाण्यातील रोगजंतूचे प्रमाण अधिक असते. सांडपाणी (grey water)स्वयंपाक घर,स्नानगृह,कपडे धुणे यातून येणाऱ्या पाण्याला सांडपाणी असे म्हणतात.अशा पाण्यात रोगजंतूचे प्रमाण तुलनेने कमी असते. शासन परिपत्रक क्रमांक स्वभामि क्रमांक २०२०/प्र.क्र.११६ पापु नुसार,विवरणपत्र ड अंदाजपत्रक आराखडयामध्ये समावेश करावयाच्या घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन उपाययोजना तथा स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)-टप्पा-२ इतर कृती संगमामधून(Convergence) हाती घ्यावयाच्या उपांगांचा तपशील दिलेला आहे.

शासन निर्णय : पहा






हागणदारीमुक्त अधिक (ODF +) ग्राप जाहीर करणे निकष कालावधी : -


हागणदारीमुक्त अधिक" (ODF+) हे स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण (SBM-G) अंतर्गत एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे ODF स्थिती टिकवणे:

ODF+ गावांनी त्यांची उघड्यावर शौचापासून मुक्त (ODF) स्थिती कायम राखणे आवश्यक आहे.
घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन:

थोडक्यात, ODF+ म्हणजे केवळ उघड्यावर शौचापासून मुक्त असणे नव्हे, तर स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण तयार करणे.

हागणदारीमुक्त अधिक (ODF+) निकष हे केवळ शौचालये बांधण्यापुरते मर्यादित नाहीत, तर शाश्वत स्वच्छतेवर भर देतात. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

• शौचालयांचा नियमित वापर: गावातील सर्व लोकांनी नियमितपणे शौचालयांचा वापर करणे आवश्यक आहे. उघड्यावर शौचास जाणे पूर्णपणे थांबवणे.
• शौचालयांची स्वच्छता: शौचालये स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. नियमितपणे स्वच्छता करणे आणि पाण्याची उपलब्धता असणे.
• घनकचरा व्यवस्थापन: गावातील घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे.
• सांडपाणी व्यवस्थापन: सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सांडपाणी गटारात किंवा योग्य ठिकाणी सोडणे.
• सार्वजनिक स्वच्छता: सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
• जागरूकता आणि शिक्षण: लोकांना स्वच्छतेच्या सवयींबद्दल जागरूक करणे आणि शिक्षण देणे आवश्यक आहे.
• शाश्वतता: हागणदारीमुक्त स्थिती कायम राखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे.

हागणदारीमुक्त अधिक (ODF+) निकष पूर्ण करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:
• गावातील सर्व कुटुंबांकडे शौचालयांची सुविधा असणे.
• गावात सार्वजनिक शौचालयांची सुविधा असणे.
• शौचालयांचा योग्य वापर आणि नियमित स्वच्छता राखणे.
• घनकचरा आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे.
• लोकांमध्ये स्वच्छतेच्या सवयींबद्दल जागरूकता निर्माण करणे.
• शाश्वत स्वच्छतेसाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे.

सरकारी योजना आणि मदत:
• स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत, सरकार शौचालये बांधण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी आर्थिक मदत पुरवते.
• सरकार विविध योजनांद्वारे लोकांना स्वच्छतेच्या सवयींबद्दल शिक्षण आणि जागरूकता निर्माण करते.
• हागणदारीमुक्त अधिक (ODF+) निकष पूर्ण करण्याचे फायदे:
• रोगराई कमी होते.
• आरोग्य सुधारते.
• पर्यावरण स्वच्छ राहते.
• गावाची प्रतिष्ठा वाढते.



शासन निर्णय : पहा






सार्वजनिक शौचालय कालावधी : -


सार्वजनिक शौचालय (Public Toilet) म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या वापरासाठी असलेली शौचालये. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण )टप्पा -2 अंतर्गत गावाची हागणदारीमुक्त स्थिती शाश्वत व अबाधित राहण्याचे दृष्टीने तसेच स्वच्छतेपासून कोणीही वंचित राहणार नाही हे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य होण्यासाठी ज्या कुटुंबाकडे जागे अभावी वैयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबांना तसेच गावामध्ये विविध कारणामुळे बाहेरून ये -जा करणाऱ्या स्थलांतरित लोकांसाठी आणि ज्या ठिकाणी लोकांची नेहमी वर्दळ असते . (उदा. बाजार) अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधणे आवश्यक आहे.

सार्वजनिक शौचालयांचे महत्त्व:
•सार्वजनिक आरोग्य: सार्वजनिक शौचालयांमुळे सार्वजनिक आरोग्य राखण्यास मदत होते.

•स्वच्छता: सार्वजनिक शौचालयांमुळे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यास मदत होते.

•सुविधा : सार्वजनिक शौचालयांमुळे लोकांना सोयीस्करपणे शौचास जाण्याची सुविधा मिळते. सार्वजनिक शौचालये ही केवळ सुविधा नाही, तर ती समाजाच्या आरोग्य, सुरक्षितता आणि प्रगतीसाठी मूलभूत गरज आहे.

सार्वजनिक शौचालय निधी – रक्कम रु-३,००,०००/-

७०% निधी स्वच्छ भारत अभियान -२,१०,०००

३०% निधी ग्रामपंचायत १५ वित्त आयोग /ग्रामनिधी -९०,०००/-

शासन निर्णय : पहा






माहिती उपलब्ध नाही
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी किती अनुदान मिळते? स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेच्या वरील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. या अंतर्गत 12,000 रुपये अनुदान मिळते.
2 स्वच्छ भारत अभियान वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदानासाठी पात्रता काय आहे? दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबे.
दारिद्र्यरेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, भूमिहीन मजूर, महिला कुटुंब प्रमुख, अपंग कुटुंब प्रमुख.
3 स्वच्छ भारत अभियान वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान कसे मिळते? लाभार्थी कुटुंबाने वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करून वापर सुरू केल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामसेवक खात्री करतात. त्यानंतर गटविकास अधिकारी, पंचायत समितीकडे प्रोत्साहनपर निधीची मागणी करतात. तालुका स्तरावर गटसमन्वयक, समूहसमन्वयक आणि संबंधित विस्तार अधिकारी शौचालयांची मागणीनुसार खात्री करतात व गट विकास अधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडे प्रोत्साहनपर अनुदानाची एकत्रित मागणी करतात. तालुक्याची मागणी प्राप्त होताच या मागणीतील लाभार्थ्यांची पायाभूत1 सर्वेक्षणानुसार नमुना चाचणी जिल्हा कक्षास केली जाते. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने तालुक्यास निधी Public Financial Management System (PFMS) द्वारे वितरित केला जातो व तालुकास्तरावरून लाभार्थीच्या बँक खातेवर PFMS द्वारे अनुदान वितरित केले जाते .
4 स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अर्ज कसा करावा? लाभार्थींनी पुढील लिंक वर जाऊन वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज करणे
https://sbm.gov.in/sbmphase2/homenew.aspx
त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर अर्ज करावा.
5 स्वच्छ भारत अभियान या योजनेचा उद्देश काय आहे? ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारणे.
उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा बंद करणे.
स्वच्छता आणि आरोग्य सुधारणे.
6 स्वच्छ भारत अभियान या योजनेअंतर्गत बांधलेल्या शौचालयाचा दर्जा कसा असावा? शौचालय टिकाऊ आणि वापरण्यास सुलभ असावे.
पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्था असावी.
शौचालय स्वच्छ आणि आरोग्यदायी असावे
7 स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी संपर्क कोठे करावा? ग्रामपंचायत कार्यालय.
पंचायत समिती कार्यालय.
जिल्हा परिषद कार्यालय.
माहिती उपलब्ध नाही
माहिती उपलब्ध नाही