वैयक्तिक लाभाची योजना - RTE 25% प्रवेश कालावधी : नविन शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीस जानेवारी महिन्यामध्ये


योजनेचा लक्षांक उद्दिष्ट - स्वयं अर्थसहाय्यित

शाळेतील इयत्ता 1 लीच्या प्रवेशाच्या 25% प्रवेश

लाभाचे स्वरुप - शासनाने ठरविलेल्या किंवा शाळेने आकारलेल्या शैक्षणिक फी या पैकी कमी रक्कमेची प्रतिपूर्ती शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा होते.

पात्रता व अटी - वंचित व दुर्बल प्रर्वगातील इयत्ता 1 ली मध्ये प्रवेशासाठी पात्र असलेले विदयार्थी

अर्जाचा नमुना व अर्ज करण्याची पध्दत - ऑनलाईन

शासन निर्णय : पहा






माहिती उपलब्ध नाही
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 शिक्षण विभागशिक्षण विभागाकडील समाज कल्याण शिष्यवृत्ती योजना माहिती दया? ही योजना शाळांतील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे-
- विहित नमुन्यातील अर्ज
- आधार कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला
- विद्यार्थ्यांचे गुणपत्रक
- जातीचा दाखला
- आधार संलग्न असले बाबतचा दाखला
2 शिक्षण विभागशिक्षण विभागाकडील राजीव गांधी सानुग्रह योजना माहिती दया? जिल्हा परिषद शाळेतील एखादा विद्यार्थी अपघातात दगावला गेला तर त्यासाठी ही योजना राबविण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे
- एक नमुन्यातील अर्ज
- मुख्याध्यापक शिफारस पत्र
- पोस्टमार्टम रिपोर्ट
- पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन कडील F.I.R
3 शिक्षण विभागइयत्ता पहिली करिता 25% आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया कशी असते? विनाअनुदित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 25 % आरक्षण असते.
-लाभार्थी पात्र यादी
1. बिगर मागास प्रवर्ग यांच्याकरिता एक लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले.
2. मागास प्रवर्गासाठी जातीचा दाखला आवश्यक
3. 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेले विद्यार्थी
4 शिक्षण विभागशिक्षण विभागाकडील शालेय पोषण आहार योजना कोणासाठी असते व ती कशी राबवली जाते? इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत मध्यान भोजन योजना राबवली जाते. ही योजना सन 1995 96 रोजी सुरू झालेले आहे.
5 शिक्षण विभागशालेय पोषण आहार योजनेचे स्वरूप व याची उद्दिष्टे काय आहेत? शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार आहार बनवून दिला जातो तसेच प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार दिला जातो.
- योजनेची उद्दिष्टे
1. देशातील मुलांना पोषक आहार मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारावे
2. या योजनेसाठी शासनाने नियुक्त केलेल्या पुरवठा द्वारा मार्फत तांदूळ व धान्यदि मालाचा शाळांना पुरवठा केला जातो .
3. सदर आहार शिजवून देण्यासाठी स्वयंपाकी व मदतनीस ( शासन नियुक्त ) मार्फत शाळेत आहार तयार करून नियमित मध्यन्ह भोजना वेळी दिला जातो
  • शिराळाच्या पुरातन वारसाशिक्षण विभाग



    शिराळा, हे गाव सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या गावाचा इतिहास फार जुना आहे. या गावाला '32 शिराळा' असेही म्हणतात. या गावाची यशोगाथा खालीलप्रमाणे आहे: ऐतिहासिक महत्त्व: • शिराळा गावाचा इतिहास खूप जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील 32 खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता, म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले. • छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेताना त्यांना सोडवण्याचा प्रयत्न फक्त शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर झाला. त्याचे नेतृत्व किल्लेदार पिलाजी देशमुख आणि दीक्षित यांनी केले होते. सांस्कृतिक महत्त्व: • नागपंचमी: शिराळा गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या गावात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा आहे. • गोरक्षनाथ मंदिर: शिराळा गावात गोरक्षनाथांचे प्राचीन मंदिर आहे. • महालक्ष्मी मंदिर: या गावामध्ये प्राचिन अस महालक्ष्मीचे मंदिर आहे. भौगोलिक महत्त्व: • शिराळा तालुका वारणा नदीच्या काठावर वसलेला आहे. • तालुक्याच्या शेवटी चांदोली अभयारण्य आहे. • आशिया खंडातील सर्वात मोठे मातीने बांधलेले धरण म्हणून चांदोली धरण ओळखले जाते. आधुनिक विकास: • शिराळा गावात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. • गावात अनेक शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये आहेत. • गावात रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. शिराळा गाव हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. या गावात अनेक समस्या आहेत, पण या समस्या सोडवण्यासाठी गावातील लोक एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत.

    अधिक वाचा....

  • कहानी स्वातंत्र्याची.....बिळाशी च्या बंडाचीशिक्षण विभाग



    बिळाशी हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वसलेले आहे. हे गाव वारणा नदीच्या काठावर असून, सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आहे. या गावाचा इतिहास फार जुना आहे. या गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गावाची भौगोलिक परिस्थिती बिळाशी गाव वारणा नदीच्या काठावर वसलेले असल्याने, या गावाला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. या गावाच्या आसपास डोंगर आणि जंगले आहेत. त्यामुळे या गावातील हवामान आल्हाददायक असते. या गावात पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. गावाची लोकसंख्या आणि व्यवसाय बिळाशी गावाची लोकसंख्या सुमारे ५००० आहे. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या गावात ऊस, भात, ज्वारी, आणि भाजीपाला यांची लागवड केली जाते. या गावात काही लोक दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन देखील करतात. गावातील महत्त्वाच्या गोष्टी • ऐतिहासिक स्थळे: बिळाशी गावात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या गावात प्राचीन मंदिरे आणि किल्ले आहेत. • धार्मिक स्थळे: बिळाशी गावात अनेक धार्मिक स्थळे आहेत. या गावात श्री विठ्ठल मंदिर, श्री महादेव मंदिर, आणि श्री गणपती मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. • प्रसिद्ध व्यक्ती: बिळाशी गावात अनेक प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या आहेत. या गावात अनेक संत, साहित्यिक, आणि समाजसेवक होऊन गेले आहेत. • वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी: बिळाशी गावात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. या गावात पारंपरिक कला आणि संस्कृती जपली जाते. या गावात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात. गावातील समस्या • पाण्याची समस्या: बिळाशी गावात उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवते. • रस्ते समस्या: बिळाशी गावातील काही रस्त्यांची अवस्था खराब आहे. • शिक्षण समस्या: बिळाशी गावात उच्च शिक्षणाची सोय नाही. • आरोग्य समस्या: बिळाशी गावात चांगल्या रुग्णालयांची कमतरता आहे. • बेरोजगारी समस्या: बिळाशी गावात तरुणांना रोजगाराच्या संधी कमी आहेत. गावातील उपाययोजना • पाण्याची समस्या: बिळाशी गावात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. • रस्ते समस्या: बिळाशी गावातील रस्त्यांची सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. • शिक्षण समस्या: बिळाशी गावात उच्च शिक्षण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. • आरोग्य समस्या: बिळाशी गावात चांगले रुग्णालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. • बेरोजगारी समस्या: बिळाशी गावात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

    अधिक वाचा....

  • तंबाखू मुक्त शाळा अभियान- रिळेशिक्षण विभाग



    तंबाखू मुक्त शाळा अभियान हा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षण विभाग,आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.अभियान राबवीत असताना जिल्हास्तरीय कार्यशाळा,तालुकास्तरीय कार्यशाळा, केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांचे कार्यशाळा घेऊन शासनाने सांगितलेल्या नऊ निकषांची अंमलबजावणी करून शिराळा तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सलाम मुंबई फाउंडेशनच्या टोबॅको फ्री स्कूल ॲपवर माहिती भरली.सलाम मुंबई फाउंडेशन कडून भरलेल्या नऊ निकषांची पडताळणी करून दिनांक 07-04-2025 रोजी तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून मा.ना.श्री.चंद्रकांत (दादा) पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा ,उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य,यांच्या शुभहस्ते घोषित करण्यात आला. तंबाखू मुक्त शाळा अभियान हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा तालुक्यांमध्ये प्रभावीपणे काम करण्यात आले.

    अधिक वाचा....

  • तंबाखू मुक्त शाळा अभियानशिक्षण विभाग



    तंबाखू मुक्त शाळा अभियान हा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षण विभाग,आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.अभियान राबवीत असताना जिल्हास्तरीय कार्यशाळा,तालुकास्तरीय कार्यशाळा, केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांचे कार्यशाळा घेऊन शासनाने सांगितलेल्या नऊ निकषांची अंमलबजावणी करून शिराळा तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सलाम मुंबई फाउंडेशनच्या टोबॅको फ्री स्कूल ॲपवर माहिती भरली.सलाम मुंबई फाउंडेशन कडून भरलेल्या नऊ निकषांची पडताळणी करून दिनांक 07-04-2025 रोजी तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून मा.ना.श्री.चंद्रकांत (दादा) पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा ,उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य,यांच्या शुभहस्ते घोषित करण्यात आला. तंबाखू मुक्त शाळा अभियान हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा तालुक्यांमध्ये प्रभावीपणे काम करण्यात आले.

    अधिक वाचा....

माहिती उपलब्ध नाही
अं.क्र.विभागतपशील 
1 शिक्षण विभागनागरिकांची सनद - शिक्षण विभाग